श्री: सिद्ध
मी सिद्ध का करण्याचा अट्टाहास धरतो?
साहजिकच ती अनंत गरज असावी जीवा मध्ये म्हणून तसेच बघितले जाते. अर्थात सिद्ध होण्याची प्रक्रिया प्रत्येक जीवात वेगळी उमटू पाहते - ते समजून घेतले तरी त्याने समाधान नाही मिळणार, कारण माझ्या मते सिद्ध होण्याची प्रक्रिया आणि न होण्याची - हे बौद्धिक पद्धतीने सोडवणे कठीण आहे.
सिद्ध होण्याचा भाव स्वीकारा. तो आहे भीतीचा किंव्हा जाणीवेच्या स्थितीचा. आणि तो भाव शक्तीच्या क्रियेमुळे निर्माण होत राहतो आणि गुंतून ठेवतो. म्हणून तो भाव कुठून येतो आणि का आणि कश्यावर निर्भर असतो, ह्यात गुंतून राहण्यात अख्खं आयुष्य निघून जाईल, तरी कळणार नाही की प्रकार काय आहे तो.
म्हणून शांत होत जाणे अभिप्रेत आहे. त्यासाठी नामस्मरण करत राहणे.
हरि ओम.
No comments:
Post a Comment