Sunday, 31 May 2026

श्री

श्री 

काही लोकांचे प्रश्न, माझ्या मते, गहन होतात आणि ते फक्त ऐकावे लागतात समोरच्याने. ते प्रश्न मांडता येतात त्या लोकांना असे नाही, पण त्याचा परिणाम त्यांच्या जाणिवेत खूप खोलवर झालेला दिसतो आणि त्या पद्धतीने व्यवहार ते इतरांन बरोबर करायला घेतात. 

प्रश्न मुळात विचारण्यासाठी नसावेत आणि त्यावरून इतरांनी सांत्वन करावे, ही अपेक्षा देखील कितपत योग्य आहे, हे बघावे. प्रश्न स्वतःला पडलेला असतो, अस्तित्वाचा, कार्याचा, संबंधाचा, परावलंबनाचा, भावनेचा, मर्यादेचा वगैरे. परिस्थिती प्रश्न सोडवते का? की काही त्यासाठी वेगळे प्रयास लागतात? हा असावा _शोध_. शोध हाती घेणे, हा स्वाभाविक गुण आहे जीवाचा आणि तसा तो केल्याशिवाय काही चैन पडत नसावे कुणालाही. पण त्यासाठी व्याकुळ व्हावे का? हा परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे...तसे ठाम उत्तर त्या प्रश्नाला कदाचित नसावे. 

मानवी समाजामध्ये असे वयोमानाचे लोकं संपर्कात येतात - जसे की लहान मुले किंव्हा वृद्ध व्यक्ती - ज्यांचे म्हणणे फक्त ऐकून घ्यायला लागते. प्रश्न खूप विकट असावेत त्यांचे आणि काहीही केल्या त्यांचे उत्तरे कुठल्याही दृश्याच्या भाषेत/ व्यवहारात/ संबंधात सापडत नाही. त्यामुळे वृद्ध लोकांची व्याकुळता कायम राहण्याची शक्यता खूप वाढू शकते. लहान मुले काय की वृद्ध लोकं काय, त्यांना वेळ, स्थळ, नाती असल्या बंधनाशी विशेष व्यवहार अवलंबून करण्यात रस नसतो. त्यामुळे त्यांचा संवाद खूप निराळा होतो, विचार वेगळे असतात, भावना वेगळ्या असतात. 

काम करणाऱ्या मंडळींना हे पचनी पाडायला लागते. संवाद जर - तर ह्या भाषेतील नसते, धडपडीचे नसते, काहीतरी कोडे सुटण्याची अपेक्षा नसते, वेळेचा आभास असतो अशी जाणीव शिथिल झालेली असावी, कधी कधी त्यांच्याच पूर्वीच्या स्मरणात मन रममाण होत राहते, अट्टाहास कोडी सोडवण्याचा रहात नसावे, वगैरे.

एका बौद्धिक अर्थाने, वरील जाणीव खूप निराळी ठरते दररोजच्या व्यवहाराच्या तुलनेने. पण मानवी जाणीव आणि सत्याच्या पार्श्वभूमीवर, ह्या लोकांना समजून घेणे आणि स्वीकारणे शक्य होऊ शकते. 

खरे पाहिले तर आपले स्वतःचे अनुभव देखील ह्या सर्व रूपातून जात असतात/ जाणार असतात. कधीतरी आपण लहान असतो आणि प्रेमाशिवाय दुसरी कुठलीच भाषा त्यावेळी ध्यानात आलेली नसते. वृद्ध लोकांसाठी कदाचित सत्य आणखीन प्रखरतेने जाणवल्यामुळे त्यांचे मन कदाचित आणखीन मोकळे झालेले असते. काम करणाऱ्या लोकांना जरा व्यवहारात गुंतायला लागत असावे मात्र. 

पण प्रश्न असा उद्भवतो, की व्यवहारात गुंतताना स्वतःला इतके स्वार्थी का करावे आणि इतके कसे परावलंबी करावे, की कुणाचीही पर्वा असू नये?! मग ह्याला _प्रगती_ कुठल्या अंगाने म्हणावी?!! 

काही लोकांचे म्हणणे असे असते की हा नैसर्गिक क्रम आहे, तर स्वार्थीपणा कधी ना कधीतरी येणार प्रत्येकाला. मला माहित नाही ह्या बद्दल विचार करताना....म्हणजे स्वार्थी होणे, हे कदाचित तिथे मन खेचले जाऊ शकेल, पण मनुष्य मग कशाला म्हणायचे? की कुठल्याही प्रसंगी, शिस्त लावून, शांतीचे ध्यान करत व्यवहारात गुंतत राहावे.  आणि असा नक्कीच निश्चय करायला लागतो आणि तिथेच बुद्धीची कस लागते. There is going to be a struggle.

आता अजून एक मुद्दा असा की प्रश्न जर स्वतःचा शोध आहे, तर तो इतरांनी सोडवायला हवा का किंव्हा इतरांची त्यामागची भूमिका काय ठरते? तर उत्तर असे सुचविले आहे की इतर जण "निमित्त" ठरतात प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्नाचे उत्तरे इतरांनी द्यावे हे काही बंधनकारक नाही, कितीही स्वतःला वाटलं तरीही. प्रश्न खूप गूढ असतो आणि त्याचे उत्तर ज्याने त्यानेच आत्मसात करायचे असते/ करावे लागते.

हरि ओम.

श्री

श्री 

स्पष्टीकरण देणे आणि पारदर्शक असणे, ही एक संकल्पना आहे. ह्यात बरेच घटक आहेत, तरीही आपण प्रामुख्याने ह्याकडे काही अंगाने बघूया -

मनुष्य स्वभाव किंव्हा जीवाचा भाव, ह्याचा एक गुण धर्म प्रस्थापित झाला असतो अस्तित्व शक्तीतून. तो असा की त्यात बरेच स्तर, साखळी, संबंध, विचार, भावना, देह व्यवहार करत राहतात आणि त्यामुळे त्यांचा एकंदरीत ध्यानात परिणाम होत राहतो. त्यामुळे अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण, भीती, राग, मर्यादित राहणे, ममत्व अशा भावना प्रस्थापित होतात. त्यांच्या प्रभावाखाली माणसाला दृश्य बद्दल आसक्ती निर्माण होते, त्यात तो गुंतून राहतो, कोडी सोडवण्याचा आटापिटा करत राहतो आणि *काहीतरी मोजके सांगू शकतो आणि काहीतरी लपवून ठेवतो (अर्ध सत्य)* . एका दृष्टीने हे नैसर्गिक आहे की माणूस काहीतरी लपवणार (त्याची गरज त्याला भासेल, इतकेच नव्हे तर ह्या स्वतःच्या मनोरचनेत तो सतत गुंतून राहील) आणि दुसऱ्या दृष्टीने हा दोष आहे शुद्ध होण्याच्या मार्गावर.

हा स्वभाव बरोबर करण्यासाठी एक पर्याय बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न केला आहे की - सगळ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण देत रहाणे - की संबंधांचे मूळ, साखळी, व्यवहार, निर्णय, वस्तू, परिणाम...सगळच. This is the modern way of defining transparency in communication. ह्यात इतर खूप घटक आहेत, जसे की विघटित होणारी क्रिया, भीती, बुद्धिवादीन स्वभाव, स्वावलंबी होण्याची सतत धडपड, effeciency, वगैरे. पण असे दिसून येते की एका मर्यादेच्या पलीकडे ही मागणी करत गेलो, तर त्याने मन दुखावते, कष्टी होते, त्रासिक होते, दुःखी होते. ह्याचा अर्थ की मनाची गरज आणि त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करण्याचा अभ्यास घेतलेला दिसत नाही आहे. 

आता दुसरा मार्ग म्हणजे आध्यात्मिक वाटचाल. ती अशी की मनुष्य मान्य करतो, की स्वतः मध्ये असे काही अवगुण असावेत, जेणेकरून मर्यादा प्रकट होत राहतात, गरज निर्माण होते, गुंतणे येते, आणि सर्व अनुभव संक्रांत होण्याची गरज निर्माण होते. त्याला "दोष" न मानता, ह्या अवगुणांना शांत कसे होऊ द्यावे, हा आध्यात्मिक प्रश्न निर्माण होतो. मग मार्ग आध्यात्मिक असणार साहजिकच...फक्त बौद्धिक नाही. दररोज विचार येतील, प्रभाव घालतील, आणि त्यातून परिणाम अनुभवात येतील. विचारांचे होणे, वावरणे, परिवर्तित होणे, ही शक्ती असावी, ज्यात अनेक स्तर असावेत आणि त्यांचे कार्य आपला भाव निर्माण करत असावेत. असे असल्यास, आध्यात्मिक शोध त्या सूक्ष्म स्तराचा होतो, ज्यावरून सत्याची प्रचिती येते.

हरि ओम.

श्री

 श्री 


मला वाटतं की स्पष्टीकरणाची गरज निर्माण केली गेली असावी... ती पहिल्यापासून नसावी. 

हा गूढ प्रश्न आहे, की स्पष्टीकरण कशी मनात संक्रांत झाली आणि त्यात सार्वजनिक आणि व्ययक्तिक दोन्ही घटक सामील असावेत. 

मन जसे बदलत गेले, तशी ही स्पष्टीकरणेची भूमिका (आणि त्यातून इतिहासाची गणना) झाली असावी. त्यातून _मूळ_ ह्या शब्दाची संकल्पना मांडली गेली असावी. 

एकंदरीत, इथे वाटचाल बौद्धिक शक्तीकडे दिसून येते, जी कदाचित परिस्थिती त्याच्या अगोदर वेगळी असावी, म्हणून बदल, स्मरण, इतिहास, मूळ - अशा संकल्पना मांडण्याचीही गरज नसेल का?! 

एक व्याख्या प्रगतीची म्हणजे _प्राचीन_ संकल्पना, _भविष्य_ संकल्पना आणि जोडणारे दुवे असा काहीसा दिसून येतो, आणि त्या प्रमाणे प्रवाहाकडे बघितले जाते.

पण प्रश्न असा आहे, की सत्य कदाचित ह्या पलीकडेही असेल (म्हणजे आपण मांडलेल्या संकल्पनेच्याही पलीकडे), आणि त्यात "चक्र", अदृश्य, दृश्य, परिवर्तन, गुढत्व, संबंध - अशा गोष्टींची जागा असावी! 

तसे असल्यास, अभ्यास गहन असावा मूळ जाणून घेण्याचा किंव्हा आत्मसात होण्याचा. आपण कशानेही ठरत नसतो - ना प्राचीन, ना भविष्य, ना आत्ताचा क्षण. आपण फक्त "असतो".

हरि ओम.

Friday, 29 May 2026

श्री: काही विचार

 श्री: काही विचार


संकल्पना, किंव्हा होणाऱ्या गोष्टींचे चिंतन, प्रत्यक्ष अनुभव वावरत होताना, आणि परिणाम भोगण्यातून होणारे चिंतन - ह्या तिन्ही गोष्टीतून शांत होण्याचा मार्ग निघतो....म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींना "सामोरे" जायला लागते. त्याला आपण अनुभवांचा प्रवाह असेही म्हणून शकतो आणि त्यातून घडणारा प्रवास जाणिवेचा. अध्यात्म अभ्यासात ह्या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे - की योग्य विचार म्हणजे काय, प्रत्यक्ष अनुभवात जाणीव कशी असावी आणि परिणामांकडे कसे बघावे....थोडक्यात हे सर्व ध्यानात असणारे चक्र आहे, किंव्हा _संबंधांचे स्वरूप_ आहे, म्हणून सर्व संबंधित असणाऱ्या गोष्टींवर टीका केली आहे. 

संबंध होत राहतात भगवंत इच्छेतून आणि एकातून एक अशा गोष्टी ध्यानात संक्रांत होतात. त्या गोष्टींचे चक्र म्हणजे स्तर,भाव, आतून ते बाहेर होणारी प्रक्रिया, भगवंत भाव ते दृश्याचे स्थान, दृश्य आणि मी ह्यात होणारा संबंध, भगवंत आणि मी, भगवंत आणि दृश्य वगैरे. 

विचार - हे काल्पनिक आहे, प्रत्यक्ष अनुभव संक्रांत करणारे आहे, भावनेतून निर्माण झालेले आहे, गूढ माध्यमातून स्थित झालेले आहे, चिंतनात असणारे आहे. म्हणजे सत्याचे अस्तित्व, त्यातून येणारा संबंध, त्यातून होणारा विचारांचा स्वभाव, त्यातून निश्चय क्षमता, त्यातून अनुभव, त्यातून परिणाम, त्यातून चक्र - असा काहीसा _गूढ संबंध अस्तित्वाशी जोडला गेलेला दिसत आहे._

 _सर्वांगीण अनुभव_ ह्याला म्हणत असावे आणि ते कसे योग्य व्हावे जेणेकरून शांती ध्यानात येते, हा अध्यात्म अभ्यासाचा ध्येय मानावा. त्यात सुचवलेले मार्ग, आणि त्यातील एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

 *प्रत्यक्ष* सत्याला सामोरे जाणे आणि ध्यानात येऊ देणे सर्व काही असते. अस्तित्व, हा प्रत्यक्षाचा भाग आहे, म्हणून त्यात प्रत्यक्षपणे सारे स्तर, त्याचे कार्य, त्याचे संबंध, परिणाम, भोग, जाणीव - हा स्वतःच्या अनुभवातील घडणाऱ्या गोष्टी असणार आहेतच. 

ह्यावरून असे आत्मसात होणे आहे, की संपूर्ण कार्य, हे भगवंताच्या इच्छेमुळे प्रस्थापित होते...म्हणजे संपूर्ण प्रकाराचे जे काही संबंधांचे रूप निर्माण होत असतील ते. अशी एकही जागा नाही, किंव्हा एकही काळ नाही, किंव्हा एकही विचार नाही, किंव्हा एकही क्रिया नाही, किंव्हा एकही संबंध नाही - ज्यात भगवंताचे वास्तव्य नसते. म्हणून सर्व गोष्टींचे, स्वतः होण्याचे, परिवर्तनाचे - हे भगवंताशी जोडलेल्या गोष्टी असतात. 

हरि ओम.

Shree

 Shree 


Liberation from dependence through effective use of intellect is an illusion. The idea of liberation as conceived by intellect _may result_(unknowingly) in further isolation, aggression, speed, weird expectations, desperations, disconnections, fragmentation, rupture, exploitation and so on. 

Neither can the mind 'avoid' effects of vibrations. So, essentially there is a problem of acceptance of self/ existential phenomenon. The problem has no intellectual answer, according to me. And to find one, may land in an inversion idea of intellect, which again, may cause annoyance. How can intellect decode it's own beginning by its own language?!! 

Therefore there needs to be an approach of something different, _beyond_ the path that is felt by the intellect. 

Hari Om.


श्री 

वरील लेखाचे तात्पर्य हे, की विचारांचे मर्यादा आत्मसात व्हायला हवे आणि त्यातून मार्ग प्रस्थापित होण्याची निर्मिती होते. 

विचारांना खूप काहीसे संकल्पना कळून येतात संबंधातून - काल, आज, उद्या, स्मरण, नाती, रूप, आकार, भाव, साखळी, बदल, भावना, परिणाम, चक्र, अनेक स्तर, वगैरे. ह्याचा संबंध आणि ताबा कसा मिळवावा किंव्हा त्यातून कसे सुटावे, हा प्रश्न विचार उद्भवू शकतो, पण तो प्रश्न योग्य असतो का, हे ओळखावे.  

विचारांची भूमिका वरील कित्येक घटकातून उद्भवते किंव्हा स्थित होते, तर चिंता का करावी त्या होण्याची? विचारांचा साहजिकच स्वभावही होत असेल, जो जीवाला इकडे आणि तिकडे धावपळ करायला लावेल. तो स्वभाव शांतीने बघावा. त्यातून तो स्वभाव _मावळतो_ आणि शांतीचा अनुभव प्रस्थापित होतो. 

हरि ओम.

Wednesday, 27 May 2026

श्री

 श्री 


भगवंताचा _प्रश्न_ (महत्व, गरज, प्रयास, श्रद्धा, मार्ग, कृपा) निर्माण किंव्हा स्थित व्हायला कारण गूढ असते. कशातून ती गरज निर्माण होते, हे सांगणे कठीण...भगवत कृपा म्हणावी. 

जीव असा प्राणी आहे, की त्याला स्वतःच्या स्तराची, संबंधांची, परिणामांची, भोगाची, कार्याची जाणीव असते/ प्रखर करता येते. म्हणून त्याला पडणारे प्रश्न औरच असतात! त्या प्रश्नातून शोध स्थित राहतो, तो नंतर मार्ग बनतो आणि शेवटी सत्य दर्शनास आणतो. 

प्रश्नाची रचना आणि तिला साजेल असे उत्तर रेषेसारखे सरळ नसतात बहुतांश. सरळ नाही म्हणजे ते विचारांच्याही पलीकडे स्थित असते. अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण - हा भाव सर्वांगीण सर्व स्तरात पसरलेला असतो किंव्हा स्थित असतो. म्हणून विचारांच्या शक्तीवर समाधानकारक उत्तरे सामावलेले नसतात. 

दररोजच्या दृश्यात वावरताना हालचाली हे टप्पे किंव्हा निमित्त मानावे. म्हणजे त्यांचा परिणाम शांत होण्यासाठी व्हावा, नाही की व्याकुळता प्रस्थापित होण्यासाठी. 

प्रत्येक जीवाचे त्याचे त्याचे रूप असते, विचारांची पद्धत असते. त्यातून मार्ग आत्मसात व्हावा लागतो. प्रत्येकाच्या वाट्याला प्रवास आहे, त्याला तो पत्करावा लागतो, त्याचे देणे असते, तो स्वीकारावा लागतो, त्यात कार्य करावे लागते, त्यात शरण जावे लागते. सैय्यम ठेवावा आणि शांत व्हावे.

हरि ओम.




श्री 

व्यवहार किंव्हा द्वैताशी संबंध प्रस्थापित होणे आणि स्वतःशी/ अंतर्मुख होण्यात संबंध प्रस्थापित होणे, ह्यांचे त्या त्या स्थितीत परिणाम होत राहतात आणि एकमेकांशीही संबंधित असतात. 

त्याकडे शांतीने नुसते बघावे. त्यातून काही अभिप्रेत असते का? काही मिळवायचे असते का? काही हेतू असायला हवा का? हे प्रश्न त्वरित संपणे अशक्य. ते प्रश्न असतात, म्हणून नकळत सत्याचा शोध होत राहतो. जीवात शोध, _हे कार्य_, स्थित असते, म्हणून शांतीचे दर्शन कधी ना कधीतरी होणार. त्यावर श्रद्धा ठेवावी. 

हरि ओम.

श्री

 श्री 


दर रोज व्यवहार करत असताना जाणीव रेषेसारखी किंव्हा गोलाकार किंव्हा विलीन - ह्या तिन्ही स्थितीत वावरू शकते किंव्हा वावरण्याची परिस्थिती उद्भवू शकते. जाणिवेचे रूप कसेही जरी होत असले त्या क्षणी, तरीही जाणीव भगवंताची शक्तीच आहे ह्या भावनेत कायम स्थिर असायला हवी - म्हणजेच की मुळातील सर्व प्रकाराचे संबंध, प्रवाह, स्तर, कार्य हे भगवंताने प्रकट केले आहेत, असे ओळखणे आणि कायम त्या ध्यानात राहणे. ह्याला "स्थिर होणे" असे म्हणतात, की स्मरण सतत भगवंताचे असते, अनुसंधान त्याचेच असते. 

आपण म्हणजे जीव, विषय सोडवणे कठीण. कितीही विचार केला, तरीही त्यातून अहं भाव प्रस्थापित राहतो. अहं भावाचे एक विशिष्ठ क्रिया असते, म्हणून परिणाम होतात. आपल्याला व्याकुळता येईल, दुःख होईल, कष्ट होतील, प्रश्न पडतील, दुविधेत असू, हे सगळं अहं भाव ध्यानात असल्यामुळे होणारा परिणाम. म्हणजेच एका अर्थी भावातून होणारी क्रिया, चक्र, संबंध, जाणीव आणि परिणाम (perception/ memory)!

दृश्यात वावरत असताना प्रश्न येणारच आणि मनासारखे गोष्टींच्या हालचाली नसणार. म्हणजेच सत्य वेगळेच असते, ही जाणीव होण्याची गरज आहे. आपण संबंध असे का लावतो, हा गूढ सवाल आहे. _संबंधांचे उत्तरे_ बुद्धी किंवा विचारात सामावलेले नाही, त्यासाठी शांत होणे अभिप्रेत आहे.

कुठल्याही परिस्थितीत शांत होण्याचा अभ्यास चालू ठेवावा.

हरि ओम.




श्री 

भगवंत जाणीव आहे, वस्तू नाही. सर्व वस्तू स्वतःतूनच येत असतात, तसेच भगवंत स्वतः मधेच ओळखायला हवा. ह्याला _दुहेरी_ परिणाम म्हणायचा जाणीव राखण्याचा. जाणीव म्हणलं तर दुहेरी परिणाम आला. 

 _सर्व गोष्टी होत राहतात_, गती असते, हालचाली असतात, बदल असतात, संबंध असतात.  हे ओळखावे, पचनी होऊ द्यावे, स्वीकारावे आणि शांत रहावे. 

दृश्याचे प्रयोजन काय, ह्यासाठी भगवंताचे चिंतन करत राहावे. हा सवाल बौद्धिक असतो का?! की आणखीन सूक्ष्मात सामावलेला असतो? प्रश्नाचे उत्तर आणि सूक्ष्मात पदार्पण होणे हे अवलंबून असते का?!! अवलंबून संकल्पना आपण निर्माण होऊ देतो - तसे प्रत्यक्षात होण्याची गरज नसते! 

आणि तेच शिकायचे असते किंव्हा जाणीव तशी होऊ द्यायची असते. 

हरि ओम.